शेतकरी विरोधी विधेयक 2020 रद्द करा:  जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

शेतकरी विरोधी विधेयक 2020 रद्द करा:  जिल्हा युवक काँग्रेसची मागणी...


लातूर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी विधेयक 2020 असंवैधानिक पद्धतीने मंजूर करून मुठभर व्यापार्यांचे हित साधणारा विधेयक सभागृहामध्ये मंजूर करून घेतला तरी हे विधेयक तात्काळ रद्द करून त्वरित विशेष अधिवेशन बोलावून सर्व संम्मतिने लोकशाही पद्धतीने विधेयक पारित करण्यात यावा व सबंध देशातील शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन महामहिम राष्ट्रपति भारत सरकार यांना उदगीर उपजिल्हाआधिकारी मार्फत देण्यात आले.


 यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.विजय राजेश्वरजी निटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेस जिल्हासरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर यांच्या नेतृत्वखाली निवेदन देण्यात आले यावेळी उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष श्री.अमोल घुमाडे,लोकभारती पक्षाचे श्री.अजित शिंदे,उदगीर विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्राध्यापक नागेश पटवारी,सद्दाम बागवान,आदर्श पिंपरे,अविनाश गायकवाड,महेश तोडकर, सतीश पाटील मानकीकर,ईश्वर समगे,एडवोकेट धम्मानंद कांबळे, प्राध्यापक जावेद शेख होनाळीकर,अरुण कांबळे दिपक जाधव इत्यादि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.